अण्णाभाऊ साठे खर्या अर्थाने लोकलेखक होते!
विषमताग्रस्त समाजात दलित-पददलितांवर पदोपदी अन्याय होतो. आणि म्हणून त्यांना संघर्ष करावा लागतो. संघर्ष हा अण्णा भाऊंच्या साहित्याचा प्राणबिंदू आहे. संघर्ष कशासाठी? कुणासाठी? व कुणाविरुद्ध हे प्रश्न ओघाने आलेच. अण्णाभाऊंच्या कथा-कादंबर्यांमधला संघर्ष शोषण आणि व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. तो दलित-पीडित-शोषित-वंचितांसाठी आहे. तो त्यांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी आहे.......